‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानातून पर्यावरण संवर्धनाला गती; जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जनजागृती

महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानातून पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात असून जागतिक वसुंधरा दिनानिमित्त नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.

Apr 21, 2026 - 19:49
 0  6
‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानातून पर्यावरण संवर्धनाला गती; जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जनजागृती
माझी वसुंधरा 6.0, पर्यावरण संरक्षण महाराष्ट्र, जागतिक वसुंधरा दिन,

मुंबई/प्रतिनिधी – पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियान प्रभावीपणे राबवत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पंचमहाभूतांचे—पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश—संरक्षण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

नैसर्गिक जलाशय, जैवविविधता आणि परिसंस्थेचे संतुलन राखणे हे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे घटक मानले जात असून, अशा उपक्रमांमुळे कार्बन शोषण वाढते, हवामान बदलाचा प्रभाव कमी होतो आणि मृदेची धूप रोखली जाते. परिणामी, स्थानिक समुदायांना शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतात.

‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानांतर्गत राज्यातील महापालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींना पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय भूमिका देण्यात आली आहे. वृक्षारोपण, जलसंधारण, सांडपाणी पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन आणि हरित ऊर्जा वापर यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे.

नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ई-प्रतिज्ञा, जनजागृती मोहिमा आणि ‘पर्यावरण दूत’ ही संकल्पना राबवण्यात आली आहे. तसेच कामांची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी जिओ-टॅगिंग, ऑनलाइन नोंदणी आणि तृतीय पक्ष मूल्यांकनाची प्रणाली लागू करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यात येत आहे.

शाळा आणि महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता अभियान आणि हरित परिसर निर्मिती यावर विशेष भर देण्यात आला आहे.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेनुसार पृथ्वीचे रक्षण करणे म्हणजे आपल्या भविष्याचे रक्षण करणे होय, असा संदेश देण्यात आला आहे.

प्रत्येक नागरिकाने छोट्या-छोट्या कृतीतून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संकल्प केल्यासच भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी वसुंधरा निर्माण होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0