मराठवाड्यात उन्हाचा तीव्र तडाखा; तापमान ४३ अंशांवर, नागरिक हैराण
मराठवाड्यात एप्रिलच्या मध्यापासून तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत पोहोचले असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मराठवाडा ब्यूरो - लक्ष्मण चौरे
मराठवाडा : एप्रिल महिन्याच्या मध्यापासूनच मराठवाडा विभागात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागला असून तापमानाने ४० ते ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
औरंगाबाद, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना या जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसत आहेत. कडक उन्हामुळे शेतकरी, मजूर तसेच बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उष्माघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पाण्याची टंचाईही वाढू लागली असून काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागात विहिरी आणि बोअरवेल्स कोरड्या पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर कापड किंवा टोपी वापरणे तसेच हलका आहार घ्यावा, असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1