देशातील पहिली डिजिटल जनगणना 2027; स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

देशातील पहिली डिजिटल जनगणना 2027 दोन टप्प्यांत होणार असून नागरिकांनी स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन माहिती भरता येणार आहे.

Apr 24, 2026 - 23:28
 0  3
देशातील पहिली डिजिटल जनगणना 2027; स्व-गणना सुविधेचा लाभ घ्या – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
देशातील पहिली डिजिटल जनगणना 2027;

गडचिरोली प्रतिनिधी 

| दि. २४ (जिमाका) भारतातील पहिली डिजिटल जनगणना 2027 ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक प्रक्रिया असून नागरिकांनी स्व-गणना (Self Enumeration) सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

दोन टप्प्यांत होणार जनगणना

जनगणना-2027 ही दोन टप्प्यांत पार पडणार आहे.

टप्पा 1 – घरयादी व घरगणना: 16 मे 2026 ते 14 जून 2026

टप्पा 2 – लोकसंख्या गणना: फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार

या संपूर्ण प्रक्रियेत अचूक आणि विश्वासार्ह माहिती संकलनावर भर दिला जाणार आहे.

प्रथमच स्व-गणना सुविधा

यंदाच्या जनगणनेत प्रथमच नागरिकांना स्वतः मोबाईल किंवा संगणकाद्वारे माहिती भरता येणार आहे.

नागरिकांनी https://se.census.gov.in⁠� या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या कुटुंबाची माहिती नोंदवायची आहे. ही सुविधा 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.

स्व-गणना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना Self Enumeration ID (SE ID) मिळणार असून ती जतन करून ठेवणे आवश्यक आहे. प्रगणक घरी आल्यानंतर ही आयडी दाखवणे बंधनकारक राहणार आहे.

ग्रामीण व शहरी नागरिकांना आवाहन

शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन जनगणना प्रक्रियेत थेट सहभाग नोंदवावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

विकास योजनांसाठी महत्त्वाची माहिती

जनगणनेतून मिळणारी आकडेवारी पुढील दहा वर्षांसाठी शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रेशन व्यवस्था आणि रोजगार योजना यांच्या प्रभावी नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे ही आपली जबाबदारी समजून सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मदतीसाठी संपर्क करा

स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित तहसील कार्यालय, नगर परिषद किंवा नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जबाबदारी ओळखून जनगणना-2027 यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0