ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा : मंत्री जयकुमार गोरे
नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात आलेल्या ग्रामविकास भवनाची मंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी केली. ग्रामीण विकास विभागाच्या कामकाजात अधिक समन्वय, सुसूत्रता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी हे भवन महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात आलेल्या ग्रामविकास भवन या शासकीय इमारतीची आज ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून पाहणी करण्यात आली. ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम, आधुनिक आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हे भवन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.
ग्रामविकास भवनामध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय समन्वय तसेच प्रशिक्षण उपक्रम राबविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या भवनातील प्रशासकीय विभाग, प्रशिक्षण कक्ष, बैठकींसाठीची सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांची यावेळी सविस्तर पाहणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. राज्य शासन ग्रामीण विकास विभागाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता, कार्यक्षमता आणि समन्वय निर्माण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
राज्यातील ग्रामविकासाशी संबंधित विविध उपक्रम, प्रशिक्षण प्रक्रिया आणि प्रशासकीय नियोजन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामविकास भवन हे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
