नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. फार्मर आयडी दुरुस्ती, तुषार सिंचन अर्ज प्रक्रिया आणि रेशीम योजनेतील अडचणी सोडविण्यावर भर देण्यात आला.
मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून योजनांचा लाभ सुलभ आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आमदार प्रकाश सोळंके, स्मार्ट प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक मीनल करणवाल तसेच उपसचिव कचरे उपस्थित होते.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, शासनाच्या अटींनुसार फार्मर आयडीमधील आवश्यक दुरुस्त्या करून शेतकऱ्यांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी.
तसेच तुषार सिंचन संचासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
रेशीम योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी रेशीम विभागाशी समन्वय साधून तातडीने निर्णय घेण्याच्या सूचनाही कृषीमंत्र्यांनी दिल्या.
शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवताना अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रकल्पातील तांत्रिक त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि जलद पद्धतीने मिळावा, यासाठी प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत दिले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0