विद्यापीठांनी राष्ट्रीय मानांकन सुधारावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक घेऊन राष्ट्रीय मानांकन सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
मुंबई, दि. १३ – महाराष्ट्रातील विद्यापीठांनी राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान मजबूत करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केले. राज्यातील समूह विद्यापीठांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
लोकभवन, मुंबई येथे झालेल्या या बैठकीत राज्यातील चार समूह विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. राज्यात केवळ एक-दोन विद्यापीठांनाच राष्ट्रीय मानांकनात स्थान मिळत असल्याचे नमूद करत, हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले.
समूह विद्यापीठे नवीन असली तरी त्यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये जुनी आणि नामांकित आहेत. त्यामुळे या विद्यापीठांनी राष्ट्रीय विद्यापीठ मानांकनात सुधारणा करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. राजनीश कामत, सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी व कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के तसेच वारणानगर येथील वारणा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
राज्यपालांनी विद्यापीठांनी गुणवत्ता, संशोधन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेवर भर देत राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0